Showing posts with label History. Show all posts
Showing posts with label History. Show all posts

Monday, June 16, 2008

इतिहास की पौराणिक कथा

स्वत:बरोबर इतरांचाही बुद्धिभेद करण्यात पटाइत असलेल्या भारतीय मार्क्सवाद्यांनी विनाकारणच History or Mythology हा निरर्थक वाद उकरून काढला आणि प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिह्न उभे केले. ह्या रिकामटेकड्या मार्क्सवाद्यांनी प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत वाचला असता तर ही धूळ उडायचे कारणच नव्हते. महाभाराताप्रमाणे रामायणालाही हा सिद्धांत लागू होतो.
प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत : मन्वंतरातील प्रत्येक महायुगाचे कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे चार भाग होतात. प्रत्येक युगसमाप्तीनंतर युगप्रलय होतो. महायुग समाप्ती नंतर महाप्रलय तर मन्वंतरसमाप्तीनंतर संधि प्रलय होतो. सध्या कलियुग चालू आहे. महाभारत हे द्वापारयुगात झाले. द्वापारयुगाच्या समाप्तीनंतर जो युगप्रलय झाला त्यात सर्व भौगोलिक परिस्थितीची उलटापालट झाली. डोंगर वाहून गेले आणि त्यांच्या जागी सपाट मैदाने झाली. सपाट मैदानांमधे माती-दगडांचे ढीगच्या ढीग वहात आले आणि त्यांचे विशाल डोंगर झाले. साम्राज्येच्या साम्राज्ये ह्या उलथापालथीत गाडली गेली. हे सर्व डोंगर ढीग उकारून काढले तर कौरव-पांडव-कंस ह्यांच्या अस्तित्वाचे शेकडो पुरावे सापडतील. ह्या प्रलायातून वाचण्यासाठी वाट फुटेल तिकडे माणसं पळत सुटली. जे कसेबसे वाचले त्यांच्या स्मृतीत मात्र महाभारताचा संपूर्ण इतिहास शाबूत राहिला. प्रलय ओसरल्यावर हा समग्र इतिहास त्यांनी आधी भूर्ज पत्रांवर आणि मग कागदावर लिहून काढला. हा इतिहास म्हणजेच आपल्याला सध्या ज्ञात असलेले "महाभारत" होय.
मध्यप्रदेशातील पंचमढी येथील पांडवगुंफा ह्या खरोखरच महाभारतकालीन गुंफा आहेत की नाहीत ह्याबद्दल मात्र वैज्ञानिकांत तसेच इतिहासकारांत मतभेद आहेत. ह्या मतभेदांचाच राजकीय लाभ घेण्यासाठी मार्क्सवादी निरर्थक प्रश्न विचारत आहेत. Carbon Dating सारखी अत्याधुनिक तंत्रे वापरून हे मतभेद नाहीसे करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
दुर्योधन-दु:शासन-कंस ह्यांच्या कवटया जीवाश्मांच्या रूपात सापडल्या म्हणजे ह्या उथळ डोक्याच्या मार्क्सवाद्यांची तोंडे बंद होतील; पण त्याच्या कितीतरी अगोदर त्यांचे राजकीय अस्तित्वच संपलेले असेल ...!!!